शिवपूर्वकालीन भारत
1.रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1)आठव्या शतकातील -------------------
हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय.
योग्य उत्तर: पाल
2)राजपुतांपैकी चौहान घराण्यातील---------------
हा पराक्रमी राजा होता.
योग्य उत्तर: पृथ्वीराज चौहान
3)कर्नाटकातील ---------- घराणे प्रसिद्ध होते.
योग्य उत्तर: होयसळ घराणे
4)तामिळनाडूतील ---------- घराने प्रसिद्ध होता
योग्य उत्तर: चोळ घराने
5)महाराष्ट्रातील------------ घराना प्रसिद्ध होता
योग्य उत्तर: राष्ट्रकूट घराणा
6)राष्ट्रकूट घराण्यातील--------------------याने
अलाहाबादपर्यंतचे प्रदेश जिंकून घेतले.
योग्य उत्तर: कृष्ण तिसरा
7)शिलाहारांची -----------घराणी पश्चिम
महाराष्ट्रात उदयास आली.
योग्य उत्तर: तीन घराणी
8)यादवांचा काळ हा----------- --------- आणि
-------- यांचा सुवर्णकाळच मानावा लागतो.
योग्य उत्तर: मराठी भाषा आणि साहित्य
2.एका वाक्यात उत्तरे लिहा .
1)शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय?
योग्य उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वराज्य स्थापन करण्या पूर्वीचा भारत म्हणजे
शिवपूर्वकालीन रतभा होय.
2)गुर्जर प्रतीहार या सत्तेने कोठे कोठे
सत्ताविस्तार केली?
योग्य उत्तर: गुर्जर प्रतीहार या सत्तेने आंध्र,
कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनोज, गुजरात
पर्यंत सत्तेचा विस्तार केला.
3)उत्तर भारतात कोणते घराने महत्वाची होत?
योग्य उत्तर: उत्तर भारतात राजपूत घराणे
महत्वाची होत.
4)राजपूत घराण्यामध्ये कोण कोणते घराणे
महत्वाची होती?
योग्य उत्तर: राजपूत घराण्यामध्ये गहाडवाल
घराने, परमार घराणे ही घराने महत्वाची होती.
5)तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान
याने कोणाचा पराभव केला?
योग्य उत्तर:तराई येथील पहिल्या युद्धात
पृथ्वीराज चौहान याने मुहम्मद घोरीचा पराभव
केला.
6)तराईच्या दुसऱ्या युद्धात कोणी कोणाचा
पराभव केला?
योग्य उत्तर: तराईच्या दुसऱ्या युद्धात
मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा
पराभव केला.
7)तामिळनाडूतील चोळ घराण्यातील कोणते
राजे महत्त्वाचे होत?
योग्य उत्तर: तमिळनाडूतील चोळ घराण्यातील
राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे
महत्त्वाचे होत.
8)चोळांनी आरमाराच्या जोरावर काय जिंकले?
योग्य उत्तर: चोळांनी आरमाराच्या जोरावर
मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले.
9)कर्नाटकातील होयसळ घराण्यातील कोणत्या
राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला?
योग्य उत्तर: कर्नाटकातील होयसळ
घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण
कर्नाटक जिंकला.
10)राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा
याच्या कारकीर्दीत राष्ट्रकूट सत्ता कोठे
पासून ते कोठे पर्यंत पसरली?
योग्य उत्तर: राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद
तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता
कनोजपासून रामेश्वरपर्यंत पसरली.
11)शिलाहारांची तीन घराण्यापैकी पहिले
घराणे कोठे होते?
योग्य उत्तर: उत्तर कोकणात ठाणे व
रायगड या जिल्ह्यात होते
12) दुसरे घराने कोठे होते?
योग्य उत्तर: दुसरे घराणे दक्षिण कोकणात
या जिल्ह्यात होते.
13) तिसरे घराणे कोठे होते?
योग्य उत्तर: तिसरे घराणे कोल्हापूर,
सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यात होते .
14)शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली
राजवट म्हणजे महाराष्ट्रातील कोणाची राजवट?
योग्य उत्तर: शिवपूर्व काळातील शेवटची
वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील
यादवांची राजवट होय.
15)यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची
राजधानी कोठे होती?
योग्य उत्तर: यादव घराण्यातील भिल्लम
पाचवा याची राजधानी औरंगाबादजवळील
देवगिरी येथे होती.
16)भिल्लम पाचवा यांनी सत्ताविस्तार
कोठे केली?
योग्य उत्तर: भिल्लम पाचवा यांनी कृष्णा
नदीच्या पलीकडे सत्ताविस्तार केली.
17)महाराष्ट्रात महानुभाव वारकरी संप्रदायाचा
उदय कोणत्या काळात झाला?
योग्य उत्तर: महाराष्ट्रात महानुभाव आणि
वारकरी संप्रदाय यांचा उदय यादवांच्या काळात
झाला.
No comments:
Post a Comment